Monday, July 21, 2008

दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,

दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,
ना फ़ॅन्सी ड्रेस करणार्यांची,
ना राजकारणाचा सट्टा
लावणार्या भडव्यांची.

बाजारात ह्या लोकशाहीचा
लिलाव केला.
विश्वास मत नावाने,
जगी गवगवा केला.

कुठे चुकले हो ह्यांचे?

आपणही प्रोत्साहन देत उभेच होतो की.
ह्याच बाजारात,
ह्याच बाजारात,
मुल्यांची अब्रु लुटतांना बघतच होतो की.

का द्यायचा दोष ह्या लाल गाडित फ़िरणार्यांना?
आपण साधं मत द्यायला पण पुढे सर्सावत नाही.
कित्येकांचे तर मतदार यादीत नाव ही नसेल.

आपण शंढ झालोत म्हणुन ह्या भडव्यांची चालली,
म्हणुनच आजही,
दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,.

D shivaनी
nagpoor
२१ जुलै २००८

No comments: