Wednesday, March 18, 2009

निवडणुका

ह्यांना कदाचीत आपल्याला,
कधी खुष बघा्यचच नसेल.
आपण खुष राहीलो तर त्यांचं
गणित मात्रं पक्क फ़सेल.

आपल्याच गरजांना हे
चुनावी मुद्दा बनवतात.
आपल्याच दुःखांचा सहारा,
स्वतःच्या सत्ते साठी करतात.

दरवे्ळी,आपण ्मात्रं
ह्यांच्या बनवेगीरीला भुलतो.
त्यात ह्यांची सीट पककी करुन
आपण स्वतःचच हसं करतो.

कीत्येक जण तर मतदान 
ह्याच रोषाने करत नसतील.
पण ह्यानेच नालायक नेते
निवडुन येत असतील.

बघता बघता १४ वी 
लोकशाही बनणार आहे.
काय ह्या वेळी पण लोकसभेत
हेच चित्रं रंगणार आहे?

जागे व्हा दोस्तं हो,
आपण आपला अधिकार वपरुया.
वासरात का होईना
लंगडी गाय शोधुन निवडुया.

कित्येक चांगले नेते ह्याच 
चढाओ्ढीत मागे राहीले.
जमलाच तर त्याच चांगल्या यादीत
आपलंही नाव जोडुया.

D shivaनी
Nagpoor

No comments: