आज मी अश्रुंसोबत स्वप्नं पण
वाहुन टाकील म्हणतेय.
पण जमतच नाहिये...
अपुर्ण साला अपुर्णच राहिलं,
पुर्ण तर सोडा पण आठवणींचे
घाव मिटत नाहीये...
भावंनानी एक धरण बांधलय मनात,
एकही दार उघडत नाहीये....
मनसोक्त रडायचं एकदा,
माझा भार सोसेल असा
खांदा मिळतच नाहीये...
आपसुक एखादा ओहोळ वाहतो,
पण तो पण वेदनेची
धगधग शांत करत नाहिये...
आज मी अश्रुंसोबत स्वप्नं पण
वाहुन टाकील म्हणतेय,
पण जमत नाहिये...
D shivaनी
Nagpoor
No comments:
Post a Comment