लोकं बाराही महीने
अठराही काळ माळी जपतात,
आणि मनातुन
मात्रं समोरच्याचं काळं मागतात.
आणि ह्याला लोक
अध्यात्मं म्हणतात.
असं होतं बरं का?
बरेच असे भेटतात सुद्धा,
मी ही त्यांचा मार्गावर
चालावं म्हणुन
फ़ोर्स पण करतात.
पण माझं जरा वेगळच आहे.
मला मनःशांती मिळायला,
हिमालयावर कीवा मठात
जाण्याची गरज कधीही भासत नाही.
आणि भगवंता थॅंक्स,
स्वतःच्या ताटातला घास
भुकेल्याला दिलं ना,
रस्त्याच्या कडेवर थांबुन गरजुला
साईड दिली नं,
की गजबजलेल्या CCD मधे सुद्धा
ती शांती मिळते.
लोक ह्याला माझी पैशाची ऊधळण म्हणतात,
पण माझ्या dictionarइत ह्यालाच अध्यात्मं म्हणतात.
देवाचा वास असावा म्हणुन लोक
धुप दीप लावतात.
म्हणतात की सुगंधात देव वसतो.
पण मला सकाळी सकाळी
मारलेल्या पोहाच्या तर्रित पण हा आनंद लाभतो,
स्वतःसोबत चार गरजुन्ना आणि मित्रांसोबत
ताव मरतांना मनाला देव आनंद भिडतो.
लोक ह्याला माझा अगाउ पणा म्हणतात,
पण माझ्या dictionarइत ह्यालाच अध्यात्मं म्हणतात.
D shivaनी
nagpoor
30 aug 2008
No comments:
Post a Comment